Skip to main content

अयोध्या आणि मी

लहान असताना cds सोबत खेळायला आवडायचं काय माहीत का☺️

खेळत असताना एक कोरी CD सापडली, त्याच्यावर कोणतंच नाव नव्हतं लिहिलेलं,

मग त्या videocon च्या CD Player वरती ती लावली,

Black and white मध्ये काहीतरी विडिओ चालू झाला,

त्याला आवाज नव्हता, फक्त विडिओ.

माणसं इकडं तिकडं पळत होती, कोणीतरी कुठल्यातरी इमारतीवर चढून बसलेलं, नुसता दंगाच दिसत होता.

बाबांना तो व्हिडीओ दाखवला मग बाबा म्हणाले की हा अयोध्येचा आहे.

 अयोध्येचा व्हिडिओ? मग तो व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून लावला, दादांना दाखवला, दादा म्हणजे माझे आजोबा.

दादांनी मग एक एक करून प्रत्येक गोष्ट सांगायला चालू केली. अयोध्येचा नक्की विषय काय, संघर्ष काय आणि निकाल? (तेव्हा अजून निकाल लागायचा होता)

प्रत्येक गोष्ट नीट सविस्तर कळली आणि मग घरात एक जुनी विट बाबांनी काढून दाखवली आणि मग म्हणाले "ही विट आयोध्येची, विवेक गेलेला तेव्हा त्याने आणली" 

(विवेक म्हणजे माझा काका) विवेक काका कारसेवेला गेलेला? तो होता ती मशीद पाडली तिथे? किती भाग्यवान! 

नुसता तोच भाग्यवान नाही तर आपण सगळेच किती भाग्यवान की त्याच्या सहवासात आपण राहतोय.

मग विवेक काकाकडून ऐकलेले किस्से चालू झाले, कसं रेल्वे च्या टपावर बसून अंगावर घोंगडं घेऊन आयोध्येतून परत आले सगळे.. सगळं किती धाडसी आणि किती उर भरून आणणारं आहे सगळं ते त्या लहान वयात खरंच कळत नव्हत, फक्त एवढं कळत होत की कोणीतरी बाबर अयोध्येचा मंदिराच्या जागी मशीद उभा करतो आणि शेकडो वर्षे लागतात ती पाडायला. 

२२ जानेवारी २०२४ हा दिवस ह्याच शेकडो वर्षांच्या अथक प्रयत्नांचा, संयमाचा, अधिरतेचा, संघर्षाचा फल स्वरूप आहे.

रामलल्ला तंबू मधून एका भव्य दिव्य मंदिरामध्ये जाणार.

काय आनंद होत असेल, आनंद नाहीच अत्यानंद होत असेल त्या अगणित वीरांना, कारसेवकांना. त्यांच्या कष्टाचं चीज झालं आज. आपण ह्या सगळ्यांवर चर्चा करतोय, टीव्ही वर पाहतोय, instagram वर शेअर करतोय, whatsapp च्या status ला ठेवतोय पण हे सगळं शक्य कोणामुळे आहे तर त्या असंख्य विरांमुळे, त्यांच्या ह्या लढ्या मुळे. कदाचित कोर्टाचा निर्णय आत्ता काही वर्षांपूर्वी आलाय पण त्यामागची जी तळमळ आणि जो संघर्ष आहे तो शेकडो वर्षांचा आहे. आपण आज भाग्यवान झालोय ते त्यांच्यामुळे. आज आपण संपूर्ण भारत राममय झालेला बघतोय ते त्यांच्यामुळे. त्या मंदिराच्या भूमिपूजन पासून ते आता प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंत जे काही सगळं आपण अनुभवतोय ते त्या कारसेवकांमुळे आणि त्यांच्या बलिदानामुळे.

कारसेवा आपल्याला सुद्धा करायला मिळायला हवी होती पण आता ते शक्य नाही किंवा त्याची गरजही नाही पण नशिबाने निधी संकलनाची जबाबदारी मिळाली.

सहजच एक आठवलं की रामजन्मभूमी च्या निधी संकलनात एका गावात गेलेलो तेव्हाचा अनुभव,

एका घरात गेलेलो, आणि तिथे त्या घराच्या पुरुषाने आम्हाला नाव विचारलं, आम्ही नाव सांगितलं. माझ नाव ऐकताच आतून एक छोटा (५-६ वी तला) मुलगा बाहेर आला आणि त्याने माझे पाय धरले, मी गोंधळलो, काहीच कळेना, हे असा काय ? मी त्याला उभा केलं आणि मग मी काही विचारायच्या आत त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, "Lockdown मध्ये कोणत्याच शाळेत ऍडमिशन मिळत नव्हत, मुलाचं वर्ष वाया गेलं असतं पण सरांना (माझे बाबा) एकदा भेटलो आणि त्यांनी ऍडमिशन दिली, त्यामुळं वर्ष गेलं नाही, पण सरांना भेटताच आल नाही"

माझ्या डोळ्यात पाणी भरून आल पण ते न दाखवत अजून काही लागलं तर सांगा मला असा म्हणत मी बाहेर पडलो.

म्हणूनच अभिमान वाटतो की आपण देशात वावरताना, वागताना, बोलताना, काम करताना सतत आपण ह्या देशाला काहीतरी दिलं पाहिजे ही भावना मला घरातूनच मिळाली.

आपण कधीतरी अस काहीतरी ऐकतो की खूप मोठं काम झालं चांगला काम झालं आणि आपला उर भरून येतो ना! तसा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलाय बाबांमुळे, काकामुळे, आणि दादांमुळे. 

आणि जन्मत:च संघाशी नाळ जोडलेली असल्यामुळं पाऊल दुसऱ्या वाटेला लागतच नाही. 

माझ्या बाबांनी, दादांनी(आजोबांनी), काकांनी काय केलं असं विचाराल तर सांगणं थोडं कठीण आहे, माणस तर कमावलीच पण आपल्या सोबत वावरणाऱ्यांना सुद्धा त्यांनी योग्य वाटेवर नेलं.

आणि अश्या लोकांचा सहवास मला लाभला आणि लाभतो आहे, ह्याच लोकांना बघत, ह्यांच्याकडून शिकत मी लहानाचा मोठा झालो ह्याचा मला अभिमान आहे.




Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

महाकुंभ : एका शोधयात्रेची गोष्ट

प्रयागराज – गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र. २०२५ मधील महाकुंभमेळ्यासाठी संपूर्ण शहर प्रकाशात न्हाल्यासारखे वाटत होते. लाखो भक्त, साधू-संत, पर्यटक आणि शोधक आत्मे या महासंगमात सहभागी होण्यासाठी जमले होते. याच गर्दीत एक तरुण प्रवासी होता – आदित्य, जो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी इथे आला होता. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी, आलिशान आयुष्य आणि सोयी-सुविधांनी भरलेले जग असूनही, त्याच्या मनात सतत एक प्रश्न गोंधळ घालत होता – “मी हे सगळं कशासाठी करतोय?” पहाटेचा पहिला किरण गंगेवर पडला तसे महाकुंभातील हालचालींना वेग आला. आदित्य पहिल्यांदाच अशा भव्य सोहळ्याला हजर होता. अखाड्यांचे साधू, नागा साधूंच्या मिरवणुका, मंत्रोच्चारांचा गजर आणि भक्तांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. तो गंगेच्या काठावर पोहोचला आणि डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून थक्क झाला, नागा साधू निर्वस्त्र होऊन ध्यानस्थ होते, काही संत मोठ्या भक्तिभावाने प्रवचन देत होते, काही भक्तगण नदीत स्नान करत होते, तर काही जण केवळ या वातावरणाचा आनंद घेत होते. “हे सगळं मी फक्त टीव्हीवरच पाहि...

Social Media