Skip to main content
  माणसाच्या भावना ह्या कायम निर्गुण असतात, निराकार असतात पण त्याच भावनांमध्ये दडलेला असतो त्या व्यक्ती चा स्वभाव. भावना ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात आणि त्या व्यक्त करण्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे असतात.
भावनांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. आपोआप व्यक्त होणाऱ्या नैसर्गिक क्रियेला सुद्धा एक नाव देऊन त्याचे सुद्धा प्रकार आपणच पाडलेले आहेत. प्रेम, राग, लोभ, दुःख, आनंद, समाधान अश्या वेगवेगळ्या प्रकारात भावनेचा उल्लेख केला जातो.
आपल्या सभोवताली राहणाऱ्या, फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना व्यक्त करायच्या तऱ्हा निरनिराळ्या आणि त्या भावनांचा उलगडा करणारे त्या व्यक्तीचे शब्द सुद्धा निराळे.
         आता बघा हा, “प्रेम” व्यक्त करायचे नानाविविध प्रकार आपल्या बघायला मिळतात. सिनेमा मध्ये वेगळा असतो, एखाद्या तरुणाने अनोळखी मुलीसाठी केलेला वेगळा असतो, आपल्या एखाद्या मित्राने/मैत्रिणीने आपल्याच वर्गातल्या मुलीला/मुलाला वेगळा असतो. हे सगळा असूनही प्रेम हि भावना मात्र एकच असते. कोणीतरी जमिनीवर गुढघे टेकून व्यक्त करतो, कोणी पत्र पाठवतो (हल्ली कोणी पाठवत नाही म्हणा तरीही एखादा असतो कि हो जुन्या विचारांचा), कोणी कविता तयार करतो, तर कोणी व्यक्तच करत नाही....
माझ्या एका मित्राने, माझ्याच अजून एका मैत्रिणीला प्रपोज केला, आधी पत्र पाठवला त्याच उत्तर आला नाही म्हणून मग मेसेज केला, त्याचाही उत्तर आला नाही म्हणून साहेबांनी थेट समोर जाऊन अगदी गुढगे जमिनीवर टेकवून, हात जोडून प्रपोज केला.... आणि कहर म्हणजे हे सगळा आमच्या कॉलेज च्या बस मध्ये.. परिणामतः मित्राला तिच्या भावाचा कपडे फाटेपर्यंत मार खावा लागला.
त्याच्या भावना निर्मळ होत्या, स्पष्ट प्रेमाचा भाव त्याने व्यक्त केला होता पण गडबड झाली नको तिथ व्यक्त करून बसला. तरी प्रेम भावना ही चांगली पण ती कुठे, कधी, आणि कशी व्यक्त करायची ते वेळ बघून ठरवायचं.
       प्रेम सोडा, तो विषय आपल्यासारख्यांच्या चर्चे चा नाही (म्हणजे अगदीच नाही असा नाही पण आत्ता नको) तुम्ही आनंदाच घ्या, आनंदा नाही!!!. “आनंद”, ही सुद्धा भावना आहे. मनाच्या काही फसव्या खेळांच्यात हा एक. असा म्हणतात की दुःख आणि सुख(आनंद) एका पाठोपाठ येतात, पण मी म्हणतो की आनंद कधी जातच नाही, आपण मानला तर आनंद हा प्रत्येक गोष्टींमध्ये लपलेला असतो.
म्हणूनच प्रथम मनाला समजावून सांगायला हवा की जे माझ्या बाबतीत घडतंय ते चांगलाच घडतंय...!

Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

महाकुंभ : एका शोधयात्रेची गोष्ट

प्रयागराज – गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र. २०२५ मधील महाकुंभमेळ्यासाठी संपूर्ण शहर प्रकाशात न्हाल्यासारखे वाटत होते. लाखो भक्त, साधू-संत, पर्यटक आणि शोधक आत्मे या महासंगमात सहभागी होण्यासाठी जमले होते. याच गर्दीत एक तरुण प्रवासी होता – आदित्य, जो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी इथे आला होता. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी, आलिशान आयुष्य आणि सोयी-सुविधांनी भरलेले जग असूनही, त्याच्या मनात सतत एक प्रश्न गोंधळ घालत होता – “मी हे सगळं कशासाठी करतोय?” पहाटेचा पहिला किरण गंगेवर पडला तसे महाकुंभातील हालचालींना वेग आला. आदित्य पहिल्यांदाच अशा भव्य सोहळ्याला हजर होता. अखाड्यांचे साधू, नागा साधूंच्या मिरवणुका, मंत्रोच्चारांचा गजर आणि भक्तांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. तो गंगेच्या काठावर पोहोचला आणि डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून थक्क झाला, नागा साधू निर्वस्त्र होऊन ध्यानस्थ होते, काही संत मोठ्या भक्तिभावाने प्रवचन देत होते, काही भक्तगण नदीत स्नान करत होते, तर काही जण केवळ या वातावरणाचा आनंद घेत होते. “हे सगळं मी फक्त टीव्हीवरच पाहि...

Social Media