Skip to main content

Posts

महाकुंभ : एका शोधयात्रेची गोष्ट

प्रयागराज – गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र. २०२५ मधील महाकुंभमेळ्यासाठी संपूर्ण शहर प्रकाशात न्हाल्यासारखे वाटत होते. लाखो भक्त, साधू-संत, पर्यटक आणि शोधक आत्मे या महासंगमात सहभागी होण्यासाठी जमले होते. याच गर्दीत एक तरुण प्रवासी होता – आदित्य, जो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी इथे आला होता. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी, आलिशान आयुष्य आणि सोयी-सुविधांनी भरलेले जग असूनही, त्याच्या मनात सतत एक प्रश्न गोंधळ घालत होता – “मी हे सगळं कशासाठी करतोय?” पहाटेचा पहिला किरण गंगेवर पडला तसे महाकुंभातील हालचालींना वेग आला. आदित्य पहिल्यांदाच अशा भव्य सोहळ्याला हजर होता. अखाड्यांचे साधू, नागा साधूंच्या मिरवणुका, मंत्रोच्चारांचा गजर आणि भक्तांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. तो गंगेच्या काठावर पोहोचला आणि डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून थक्क झाला, नागा साधू निर्वस्त्र होऊन ध्यानस्थ होते, काही संत मोठ्या भक्तिभावाने प्रवचन देत होते, काही भक्तगण नदीत स्नान करत होते, तर काही जण केवळ या वातावरणाचा आनंद घेत होते. “हे सगळं मी फक्त टीव्हीवरच पाहि...

बाबा

 कर्तृत्व सगळेच करतात, पण त्याच कौतुक ज्यानी करावं असं वाटत त्या माणसाला कसं सांगायचं याच कोड पडत. आयुष्यभर त्यांनी ज्या कंपनी ची गाडी वापरली, आणि ज्याचं नाव खूप प्रसिद्ध आहे अशा कंपनी मध्ये आपला मुलगा काम करतो हे किती मोठ आहे हे त्यांना कदाचित जास्त जाणवलं असत.  आज ४ जी ४.५ वर्ष झाली, त्यांचा आवाज ऐकायला, त्यांच्या नंबर वरून फोन यायला अजूनही डोळे, हात, कान ,डोकं, अगदी मोबाईल सुद्धा तरसतोय. कोणीही कितीही हक्क सांगावा आपल्यावर पण त्यांचा हक्क कोणाला देता येत नाही.  देव कधी कधी आपल्याला खूप कठीण प्रश्नावर उत्तर शोधायला लावतो. परीक्षेत out of syllabus काही प्रश्न आले तर त्याचे grace mark मिळतात पण आयुष्यात जे out of syllabus प्रश्न येतात त्यावर कोणतीच सवलत मिळत नाही.  भल्या मोठ्या घरातून थेट आपल्याला गेट च्या बाहेर उभा केलं जात आणि सांगितलं जात की आता ह्याची राखण तू करायची. घरात राहणाऱ्या प्रत्येकाची देखभाल करायची, नवीन कोणी आलं तर त्यालाही जमवून घ्यायचं, आता ह्या घराच छत तू व्हायचं.  ह्याच training कुठे मिळत नाही, ह्याच शिक्षण नसत. अगदी phd करा तुम्ही पण ह्याची शि...

रविवारच Subscription

    आज घरात निवांत असताना, अंगणात पडलेल्या धुळीला बघून माझ्या मनात विचार आला की कसं खेळलो ना आपण, ह्या मातीत, ह्या धुळीत. घातलेले कपडे आणि कपड्याच्या आतसुद्धा सगळं धुळीत माखायचं, पण खेळायची धुंदी कमी व्हायची नाही. विष अमृत, डोंगर का पाणी, विटी दांडू आणि कधी कधी क्रिकेट खेळायला कोणता व्हाट्सअॅप ग्रुप लागायचा नाही; नुसती हाक मारली की सगळी हजर. उन्ह वर चढायला लागली की कोणाच्यातरी घरात जायचं, कॅरमवर पावडर फासायची आणि अगदी हाताला कड येईपर्यंत कॅरम बोर्डवर नेम धरायचा. ज्याला क्वीन निघते त्याला कवर कधीच निघत नाही, असं म्हणायचं आणि ओम भगबुगे वगैरे मंत्र टाकायचे, समोरच्याला नेम चुकायला भाग पाडायचं. कॅरमचा डाव अगदीच जास्त खेचला गेला आणि बसून बसून पाय ओ म्हणायला लागले की बाहेर बघायचं आणि परत अंगणात दंगा करायला घुसायचं. तो चालायचा अगदी अंधार पडेपर्यंत, आणि कधीकधी अंधार पडल्यानंतरही. मग तीन-चार घरातल्या आया बाया आपली कार्टी त्या धुरकटलेल्या अंधारातून अचूक शोधून काढायच्या आणि पाठीत रपारप फटके देऊन घराकडे ओढत न्यायच्या. "अभ्यास करत जा की रे कधीतरी, परीक्षेत काय अंगावरची धूळ झटकून येणार काय?...

The night and its magic

The night and its magic, no one awake and nothing tragic! Beneath the velveteen cloak of night, the world is quite and enveloped in glow of moonlight! No footsteps near and no voices around, just the twinkle of stars sky bound! In the night shadows, all secrets are kept, as the world peacefully slept! The night, a paper for dreams to unfurl, where magic happens, in each twirl! Through the silence, the soul takes flight, in the arms of wonderful night. No sorrows, no worries on the way, just the calm mind with the end of day!

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

शुभ्या

 पू ल म्हणतात की, " काही लोकांची वागण्याची तऱ्हाच अशी असते की त्यांच्या हातात मद्याचा पेला देखील खुलतो " ह्याच काही लोकांच्यात तुझी गणना होते.  " बास की बंगलोर आता या पुण्यात" तू म्हणून म्हणून दमलास पण अजूनही ते जमलं नाही. अजूनही वाटत call करावा आणि पोटभरून शिव्या द्याव्यात तुला.  call केल्यावर कायम " काय साहेब कुठ हाय, काय कुठ पत्ता" अस तू विचारणार आणि मी कायम "हाय की इथच तुम्ही कुठाय पुणे का इस्लामपूर" अस म्हणून वाक्य तोडणार. शाळेत असल्यापासून तुझी मापं काढल्याशिवाय दिवस गेला नाही. तू आणि तुझ logic कायम next level. International tourism and Hospitality Management असा काहीतरी मोठ्या नावाचा course करायला गेलास आणि सुट्टीला samsung चा tab नाचवत यायचास. एकदा असाच मुंबई ला होतास आणि आपल्या "तात्या विंचू fan club" वरती मेसेज टाकलास "मला कसतरी होतंय" ह्या मेसेज वर सगळ्यांनी मिळून काय मापं काढली तुझी... २ दिवसांनी कळलं की तुला admit केलय आणि पांढऱ्या की लाल कोणत्यातरी पेशी कमी झाल्यात. तेव्हा जस गोसवीच्यात admit झालेलास आणि तिथून बर...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media