Skip to main content

Posts

Showing posts from 2025

Language and Identity

When we think of Karnataka, it's often only associated with Kannada. Maharashtra means Marathi. But perhaps the most uncompromising of all is Tamil Nadu, where even the mention of Hindi is unwelcome. These language-based discussions are so common these days. In the midst of all this, a book happened to land in my hands, "Ek Shunya Mee" by P. L. Deshpande. While reading it, I came across a beautiful line. Pu La says, “One who truly loves their own language can love all the languages in the world.” It’s like this, someone who understands a mother’s love can see motherhood in every mother. But looking at the current political narrative around “three-language policy,” “two-language rule,” and sometimes even “only one language,” I wonder are we really in the same country that once proudly spoke of unity in diversity? Or have we lost that country somewhere? “Speak only Kannada in Karnataka,” “Only Tamil in Tamil Nadu,” “Only Marathi in Maharashtra,” …and similar demands in ever...

"भाषा"कारण

 कर्नाटक म्हणजे फक्त कन्नड ( कन्नडा का नाही ते पुढे लिहिलंय)  महाराष्ट्र म्हणजे मराठी पण ह्यात सगळ्यात कट्टर म्हणजे तमिळ तिथे हिंदी चा उच्चार सुद्धा चालत नाही. हे सगळे विषय सतत ऐकू येत असताना, हातात एक पुस्तक आलं, ते म्हणजे "एक शून्य मी" हे पुलंच पुस्तक वाचताना खूप सुंदर ओळ सापडली. पुल म्हणतात की, आपल्या भाषेवर प्रेम करणारा माणूस जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करू शकतो. म्हणजे आपल्या आईवर प्रेम करणाऱ्याला मातृत्व म्हणजे काय हे कळतं. पण आजकालच्या ह्या राजकारणात ३ भाषा, २ भाषा तर काहीठिकाणी एकच भाषा हा मातृभाषेचा वाद बघितला की वाटत, नक्की आपण त्याच देशात राहतो का की जिथे अनेकतेमधून एकता हा अभिमानाने मान उंचावणारा विषय आहे, की तो देश हरवला?  कर्नाटकात फक्त कन्नड बोला, तामिळनाडू मध्ये फक्त तमिळ ,महाराष्ट्रात फक्त मराठी आणि इतर राज्यात त्यांची त्यांची भाषा! आज कर्नाटक सरकारने सांगितलं की सगळे सरकारी आदेश हे कन्नड मधूनच काढायचे, आणि तुम्हाला काही सरकारी कचेरीत काम असेल तर कन्नड शिका आणि मगच या. आणि जो कन्नडच (कन्नडा नाही) कारण शेवटचा डा हा फक्त हेल काढून बोलायला सोपा जावा म्हणू...

स्त्री और पुरुष

 स्त्री और पुरुष में कुछ तो अलग है,   और यही अंतर कितना सुंदर है।   यह अंतर भेदभाव का संकेत नहीं है, हर किसी की अलग ताकत है, तभी तो जीवन सुखद है।   पुरुष साहसी है, तो स्त्री भी धैर्यवान,   वह उसके पीछे खड़ी रहती है, ताकि न लड़खड़ाए उसका सम्मान। वह भी थकती है, टूटती है, पर कभी हार नहीं मानती,   घर, करियर, ज़िम्मेदारियों में, वह कभी पीछे नहीं रहती।   प्रकृति ने भले ही अलग बनाया हो, पर अवसर समान चाहिए, रास्ते अलग हो सकते हैं, पर मंज़िल की पहचान चाहिए।   वह सहारा देता है, तो स्त्री भी उसकी छाया बनती है,   जब दोनों साथ चलते हैं, तभी राह आसान बनती है।

उन्हाळ्याची सुट्टी

  उन्हाळ्याची सुटी आम्हालाही हवी आहे, वर्षभराच्या थकव्यासाठी महिन्याची तरी रजा हवी आहे. शाळेच्या सुट्टीसारखं नको work from home, वेळ हवाय मोकळा, नको meeting ची बोंब. निवांत हवं जीवन, आणि दुपारीही झोप हवी, खर तर ती शाळेसारखी उन्हाळ्याची सुट्टी हवी. हा लागूदे निकाल १ मे ला तयार आम्ही आहोत, लेखी नसली तरी परीक्षाच असते, हे सर्व जाणून आहोत. अशी सुट्टी मिळाली की उन्हा तान्हा त खेळायला ही खूप ताकत येईल. हरवलेले सोबती जेव्हा खेळायला हाक मारतील, किती मजा येईल?! ससेमिरा नको कामाचा, deadline वगैरे भानगड नको, नको तो AC आणि भली मोठी बिल्डिंग ही नको. दिवसभर खेळून खेळून पोटात जेव्हा कावळे कोकलतील, घरी केलेल्या आमरसाला तेव्हाच खरे तर चव येईल. फ्रिज वगैरे नको काही, थंड माठातल पाणी मिळेल, आइस्क्रीम, पेप्सी नको काही, बर्फाच्या गोळ्यानेच पोट भरेल. बंद ऑफिस च्या दाराकड मग महिनाभर बघणार नाही, काम वगैरे नंतर, लॅपटॉप charging लाही लावणार नाही. देवा एवढच कर,  एक वेळ लहान पण परत नाही दिलेस तरी चालेल, फक्त उन्हाळ्याची सुट्टी दे,  लहान पण आम्हाला आपोआप मिळेल. 🔗 उन्हाळ्याच्या मजेशीर आठवणी इथे वाचा!

वादळवाट

 निळ्या शार आकाशाला जसे ढंगाचे चित्र गोंदले, हिवाळ्याच्या मोसमात अवकाळी मेघ आक्रमिले! कोण सांगेल का झाले, अनोळखीचें आले वारे, ऋतुचक्र बदलून, पार विस्कटून गेले सारे. स्वभाव आहे पावसाचा, कोसळणे सतत आहे, माझ्या मनीचे, गूज सारे, गुंतून आज गेले आहे. काल होता, स्वल्प काळी, माझ्या मनीचा ऋतु हा ही, बदलून गेला थंडवारा, दमट वादळे पाहता ही. शांत कालच्या मंद लाटा, आज तुफानी साथ आहे, तू सांग, तुझ्या मनीची, कोणती वादळवाट आहे.

रहस्य महाकुंभ : भाग १

 हिवाळ्याच्या मंद थंडीत प्रयागराज नगरीत वेगळंच चैतन्य पसरलेलं होतं. महाकुंभच्या निमित्ताने संपूर्ण शहर भक्तिभावाने उजळून निघालं होतं. जिकडेतिकडे भगवे ध्वज फडकत होते, हरीच्या नामस्मरणाचा गजर ऐकू येत होता आणि गंगेच्या पाण्यात भक्तांची गर्दी लोटलेली होती. पत्रकार अमोल पाटील या महाकुंभावर विशेष वृत्तांकन करण्यासाठी आलेला होता. मुंबईच्या एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असलेल्या अमोलला या सोहळ्याचं संपूर्ण रिपोर्टिंग करायचं होतं—कुंभमेळ्यातील व्यवस्थापन, धार्मिक विधी, साधू-संतांचे प्रवचन, आणि श्रद्धेचा महासागर दाखवणारे दृश्य.   पण यावेळचा महाकुंभ काहीतरी वेगळा वाटत होता. पहिल्याच दिवशी, संध्याकाळच्या वेळी गंगेच्या किनारी फिरताना अमोलचं लक्ष काही साधूंच्या संभाषणाकडे जातं. तो मुद्दाम त्यांच्याजवळ जाऊन ऐकू लागतो.   "यावेळी काहीतरी वेगळं आहे." "गर्दीपेक्षा जास्त काहीतरी आहे इथे." "धर्मस्थळी सावध रहा." अमोलने आधी अनेकदा अशा साधूंच्या गप्पा ऐकल्या होत्या, पण या वेळी त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा तणाव होता. तो पुढे सरकतो आणि एका ...

The Lost and Found at Kumbh

 The year was 2013. The air in Prayagraj was thick with devotion, the scent of burning camphor and marigold flowers blending with the cool breeze from the Ganges. Rajesh and Sunita Jadhav had traveled all the way from Kolhapur, Maharashtra, to witness the grand spectacle of the Kumbh Mela. It was their first time at the sacred gathering, and they had brought their six-year-old son, Gopal, along.   Gopal was a lively, curious child, his small fingers tightly wrapped around his father’s hand as they moved through the endless sea of people. His wide eyes sparkled at the sight of the Shahi Snan procession—sadhus with long, matted hair smeared in ash, majestic elephants draped in saffron cloth, conch shells blowing, and chants rising like waves in the air.   “Aai, look at them!” Gopal’s voice was full of wonder as he pointed toward the Naga sadhus marching fearlessly. Sunita smiled, smoothing his hair. “Yes, beta. They are saints who have renounced everything.” ...

महाकुंभ : एका शोधयात्रेची गोष्ट

प्रयागराज – गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र. २०२५ मधील महाकुंभमेळ्यासाठी संपूर्ण शहर प्रकाशात न्हाल्यासारखे वाटत होते. लाखो भक्त, साधू-संत, पर्यटक आणि शोधक आत्मे या महासंगमात सहभागी होण्यासाठी जमले होते. याच गर्दीत एक तरुण प्रवासी होता – आदित्य, जो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी इथे आला होता. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी, आलिशान आयुष्य आणि सोयी-सुविधांनी भरलेले जग असूनही, त्याच्या मनात सतत एक प्रश्न गोंधळ घालत होता – “मी हे सगळं कशासाठी करतोय?” पहाटेचा पहिला किरण गंगेवर पडला तसे महाकुंभातील हालचालींना वेग आला. आदित्य पहिल्यांदाच अशा भव्य सोहळ्याला हजर होता. अखाड्यांचे साधू, नागा साधूंच्या मिरवणुका, मंत्रोच्चारांचा गजर आणि भक्तांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. तो गंगेच्या काठावर पोहोचला आणि डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून थक्क झाला, नागा साधू निर्वस्त्र होऊन ध्यानस्थ होते, काही संत मोठ्या भक्तिभावाने प्रवचन देत होते, काही भक्तगण नदीत स्नान करत होते, तर काही जण केवळ या वातावरणाचा आनंद घेत होते. “हे सगळं मी फक्त टीव्हीवरच पाहि...

बाबा

 कर्तृत्व सगळेच करतात, पण त्याच कौतुक ज्यानी करावं असं वाटत त्या माणसाला कसं सांगायचं याच कोड पडत. आयुष्यभर त्यांनी ज्या कंपनी ची गाडी वापरली, आणि ज्याचं नाव खूप प्रसिद्ध आहे अशा कंपनी मध्ये आपला मुलगा काम करतो हे किती मोठ आहे हे त्यांना कदाचित जास्त जाणवलं असत.  आज ४ जी ४.५ वर्ष झाली, त्यांचा आवाज ऐकायला, त्यांच्या नंबर वरून फोन यायला अजूनही डोळे, हात, कान ,डोकं, अगदी मोबाईल सुद्धा तरसतोय. कोणीही कितीही हक्क सांगावा आपल्यावर पण त्यांचा हक्क कोणाला देता येत नाही.  देव कधी कधी आपल्याला खूप कठीण प्रश्नावर उत्तर शोधायला लावतो. परीक्षेत out of syllabus काही प्रश्न आले तर त्याचे grace mark मिळतात पण आयुष्यात जे out of syllabus प्रश्न येतात त्यावर कोणतीच सवलत मिळत नाही.  भल्या मोठ्या घरातून थेट आपल्याला गेट च्या बाहेर उभा केलं जात आणि सांगितलं जात की आता ह्याची राखण तू करायची. घरात राहणाऱ्या प्रत्येकाची देखभाल करायची, नवीन कोणी आलं तर त्यालाही जमवून घ्यायचं, आता ह्या घराच छत तू व्हायचं.  ह्याच training कुठे मिळत नाही, ह्याच शिक्षण नसत. अगदी phd करा तुम्ही पण ह्याची शि...

Social Media